spot_img
spot_img
spot_img

मुंबईत ठाकरे बंधूंचा दरारा! महायुतीला काठावरचे बहुमत

झुंजार सेनापती l मुंबई

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भाजप आणि शिंदे गटाने पैसा, दडपशाही, शासकीय यंत्रणांचा वापर आणि कथित हेराफेरीचे सर्व डाव खेळूनही मुंबईत ठाकरे बंधूंचा राजकीय दरारा कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईच्या रक्षणासाठी मराठी माणूस ठामपणे ठाकरे बंधूंसोबत उभा राहिला. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवशक्तीला मराठीबहुल भागांतून भरघोस मतदान मिळाले. यामुळे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले अभेद्य राहिले, तर ठाकरे गटाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली.
दुसरीकडे, अमराठीबहुल परिसरांतून भाजप आणि शिंदे गटाला मोठे बळ मिळाले. त्यामुळे महायुती आणि शिवशक्ती यांच्यात बहुमतासाठी जबरदस्त रस्सीखेच रंगली होती. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ११४ हा जादुई आकडा गाठण्यासाठी अखेरपर्यंत तणाव कायम होता.
अखेर २२७ जागांचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले असून महायुतीने ११८ जागांसह काठावरचे बहुमत मिळवले आहे. मात्र, आकड्यांच्या या खेळातही मुंबईने ठाकरे बंधूंचा राजकीय प्रभाव आणि मराठी मतदारांची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Related Articles

चीनच्या घुसखोरीवरून लोकसभेत गदारोळ; काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

झुंजार सेनापती l नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी)  चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी तीव्र गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून...

बारामती अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय; व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट

झुंजार सेनापती l मुंबई  बारामतीतील विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेत ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!