झुंजार सेनापती l नवी दिल्ली
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील फसवणूक प्रकरणात अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला (SEC) मोठा धक्का बसला आहे. अदानींना समन्स बजावण्यासाठी केलेली मागणी भारत सरकारने दोन वेळा ठामपणे नाकारली आहे. त्यामुळे आता भारताला बायपास करून थेट समन्स देण्याची परवानगी मिळवण्यासाठी एसईसीने अमेरिकन न्यायालयात धाव घेतली आहे.
एसईसीकडून कथित आर्थिक फसवणूक आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात समन्स देण्यासाठी भारत सरकारच्या सहकार्याची आवश्यकता होती. मात्र तांत्रिक व प्रक्रियात्मक कारणे पुढे करत भारताने ही परवानगी नाकारल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या घडामोडींमुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाला असून बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण निराधार असल्याचा दावा केला आहे. मात्र भारताचा नकार आणि अमेरिकेची आक्रमक भूमिका यामुळे हे प्रकरण आता जागतिक वादाचे केंद्र बनले आहे.



