spot_img
spot_img

मातोश्री सोडताना आम्ही विचारलं का?

तटकरेंचा पलटवार

 मुंबई l झुंजार सेनापती 
अजित दादा पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “दगड चिखलात मारणं म्हणजे आपल्या अंगावरच चिखल उडवणं,” असं म्हणत त्यांनी कदमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा सूर लावला.
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर “गलिच्छ राजकारण” केल्याचा आरोप करत सुनेत्रा पवारांना घाईघाईत शपथ देण्यात आल्याची टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावर मला जास्त बोलायचं नाही. टीका करायची असेल तर त्यांनी जरूर करावी. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत ४१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पक्षाचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला आहे.”
तटकरे यांनी यावेळी कदमांच्या पक्षांतरावरही अप्रत्यक्ष टोला लगावला. “रामदास कदमांनी मातोश्री का सोडली? नंतर इतरांची साथ का धरली? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कधी त्याबद्दल विचारलं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!