spot_img
spot_img

जिल्हा परिषद मतमोजणीकडे राज्याचे लक्ष

आज निकाल

झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार असून ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले आहेत.
दुपारपर्यंत बहुतांश निकालांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी ७,४३८ उमेदवार रिंगणात असून अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांत एकूण ६८.२८ टक्के मतदान झाले.
परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ७४.८९ टक्के मतदानाची नोंद झाली, तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी ५५.७९ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

अमृत’च्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १ : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),...

Kako tiki taka casino promo code môže zmeniť váš herný zážitok

V tomto článku sa pozrieme na to, ako môže tiki-takacasino.sk promo kód zmeniť váš herný zážitok. Zameriame sa na výhody, ktoré ponúka, ako ho...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!