spot_img
7.3 C
New York
Friday, November 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त असून त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन हेक्टरपर्यंत मदतीचे निकष बाजूला ठेवून तीन हेक्टरपर्यंत मदत करण्यात येणार आहेअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 पावसामुळे आलेल्या पुरात शेतजमिनी खरडून गेल्या ओहत. अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत पावली असून गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन पॅकेजच्या माध्यमातून भरीव मदत करीत आहे. या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाहीयाची काळजी घेण्यात येत आहे. तरीही कुणी मदतीपासून राहून गेले असल्यास त्यांनाही निश्चित मदत करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.   

असे आहे पॅकेज

मृतांच्या कुटुंबीयांना: 4 लाख प्रत्येकीजखमी व्यक्तींना : 74 हजार रुपये ते 2.5 लाख रुपयेघरगुती भांडेवस्तूंचे नुकसान: पाच हजार रुपये प्रति कुटुंबकपडेवस्तूंचे नुकसान: पाच हजार रुपये प्रतिकुटुंबदुकानदारटपरीधारक: 50 हजार रुपयेडोंगरी भागात पडझडनष्ट पक्क्या घरांना : एक लाख 20 हजार रुपयेडोंगरी भागात पडझडनष्ट कच्च्या घरांना : ए‍‍क लाख 30 हजार रुपयेअंशतः पडझड: 6,500 रुपयेझोपड्या: आठ हजार रुपयेजनावरांचे गोठे: तीन हजार रुपयेदुधाळ जनावरे: 37,500 रुपयेओढकाम करणारी जनावरे: 32 हजार रुपयेकुक्कुटपालन: 100 रुपये प्रति कोंबडी.

निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10 हजार कोटी रुपये अतिरिक्तखरडून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टर थेट मदत आणि मनरेगाअंतर्गत तीन लाख रुपये प्रतिहेक्टरखचलेली किंवा बाधित विहीर: 30 हजार रुपये प्रति विहीरतातडीच्या मदतीसाठी 1500 कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीमध्ये राखीव.

दुष्काळी सवलती लागू

जमीन महसुलात सुटपीक कर्जाचे पुनर्गठनशेती कर्ज वसुलीला स्थगितीशाळामहाविद्यालय परीक्षा शुल्कात माफीरोहयो कामात शिथिलताशेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!