spot_img
spot_img
spot_img

जिल्हा परिषद मतमोजणीकडे राज्याचे लक्ष

आज निकाल

झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार असून ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले आहेत.
दुपारपर्यंत बहुतांश निकालांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी ७,४३८ उमेदवार रिंगणात असून अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांत एकूण ६८.२८ टक्के मतदान झाले.
परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ७४.८९ टक्के मतदानाची नोंद झाली, तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी ५५.७९ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

केसगळती, कोंडा आणि केसांची वाढ: कढीपत्त्याचे प्रभावी घरगुती उपाय

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केसगळती, कोंडा आणि अकाली केस पांढरे होणे ही सामान्य समस्या झाली आहे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे शरीरातील पोषण आणि रक्तशुद्धीशी थेट...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील काळाच्या पडद्याआड

झुंजार सेनापती l मुंबई मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव फॉर्च्युनर कारने ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज संभाजी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!