spot_img
spot_img

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्ला

मुंबई | प्रतिनिधी
मुंबई शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासनावर टीका केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न असताना ठोस उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, मुंबईतील हवेचा दर्जा खालावत असून सर्दी, खोकला व श्वसनविकारांच्या तक्रारी वाढत आहेत. अशा परिस्थितीत केवळ नागरिकांनी मास्क वापरणे हा उपाय ठरू शकत नाही. प्रशासनाने व्यापक आणि परिणामकारक पावले उचलणे गरजेचे आहे.
मुंबईत परदेशी मान्यवर किंवा व्हीआयपी भेटींच्या वेळी रस्त्यांची स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि इतर व्यवस्थापन तत्परतेने केले जाते. मग सामान्य नागरिकांसाठीही तितक्याच तत्परतेने उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रदूषण नियंत्रणासाठी खासगी बांधकाम प्रकल्पांना किमान एक आठवड्याची तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शहरातील विविध वॉर्डनिहाय बांधकामांचे वेळापत्रक निश्चित करून धूळ नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले.
मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून तातडीने समन्वित कृती आराखडा राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Ontdek de voordelen van spelen bij het betrouwbare Lalabet casino Nederland

In dit artikel verkennen we de vele voordelen van het spelen bij het betrouwbare Lalabet casino Nederland. Van de gebruiksvriendelijke interface van de lalabet...

राज्यातील प्रत्येक शाळेत ‘परिवहन समिती’ स्थापन करणार

झुंजार सेनापती l प्रतिनिधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता प्रत्येक शाळेत ‘परिवहन समिती’ स्थापन करणे बंधनकारक करण्यात येणार आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!