spot_img
spot_img
spot_img

अजित पवारांचा अपघात संशयाच्या भोवऱ्यात

मिटकरींच्या सवालांनी तपासावर वादळ

झुंजार सेनापती l मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. मात्र या अपघाताबाबत काही गंभीर शंका उपस्थित केल्या जात असून, राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनीही भावना व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
मुंबईहून बारामतीकडे जात असलेले विमान बारामती विमानतळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर कोसळले. 
या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे, “आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.”

 या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी अप्रत्यक्ष मागणी करत अपघातासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत:

अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले?
सहावी व्यक्ती कुठे गेली?
टेक-ऑफपूर्वी प्रवासी यादी डिजिटल नोंदली जाते, मग विसंगती का?
एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?
एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
“प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय आणि प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही,” असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा आहे.

Related Articles

बारामती अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय; व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट

झुंजार सेनापती l मुंबई  बारामतीतील विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेत ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश...

टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी)  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कामातून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!