झुंजार सेनापती l मुंबई
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता वार्षिक टोल पाससाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. १ एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून ३ हजार रुपयांऐवजी आता ३ हजार ७५ रुपये भरावे लागणार आहेत.
नवा दर आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार ३ हजार ७५ रुपये भरून वाहनधारकांना वार्षिक टोल पास मिळणार असून या पासद्वारे एक वर्षात जास्तीत जास्त २०० वेळा टोल नाक्यांवरून प्रवास करता येणार आहे.
मात्र या सुविधेत एक वर्ष किंवा २०० वेळा टोल पार करणे यापैकी जे आधी होईल ते लागू राहणार आहे. जर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच २०० वेळा टोल पार केले तर त्या पासची वैधता तत्काळ संपुष्टात येणार आहे.



