spot_img
spot_img
spot_img

धुळ्यात लग्नसोहळा ठरला रक्तरंजित; चाकू हल्ल्यात तिघांची निर्घृण हत्या

झुंजार सेनापती l धुळे : क्षुल्लक कारणावरून विवाह सोहळ्यात झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घोडेमाल गावात घडली. या प्रकरणी वऱ्हाडींपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला.
घोडेमाल येथील विज गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. त्यासाठी वऱ्हाडी गुजरातमधील सोनगड येथून दोन दिवस आधीच दाखल झाले होते. विवाह सुरू होण्यापूर्वी मंडपात दोन्ही पक्षांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
अचानक तीन-चार जणांनी वधूपक्षातील मंडळींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश गिरीगोसावी (५०), साहिल गोसावी (३०) आणि देवेंद्र पवार (३०) यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सागर गोसावी व अन्य एक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर विवाह मंडपातून पळ काढणाऱ्या कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

धनगर एकजुटीसाठी २२ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

झुंजार सेनापती l सांगली धनगर समाजाच्या उन्नतीसाठी सर्व गट-तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन समाजातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले आहे. त्यांच्या...

भारतीय सेनेची मानवंदना आणि शिवरायांच्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली

झुंजार सेनापती l नवी दिल्ली 'जय भवानी, जय शिवाजी'चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर,  तुतारींचा निनाद आणि  शाहिरी पोवाड्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशाच्या राजधानीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!