spot_img
spot_img

मनोज जरांगे-पाटील पुन्हा रणांगणात!

१६ मे रोजी दिशा ठरवणार

झुंजार सेनापती l जालना
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि कर्जावरील व्याज परताव्याचा प्रश्न रखडल्याने मराठा आंदोलक यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १६ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याची टीका जरांगे-पाटील यांनी केली. “सरकारकडे वारंवार मागण्या करूनही न्याय मिळत नाही. आता एकजूट हाच पर्याय असून संघर्षाशिवाय न्याय मिळणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना व्याज परतावा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे राज्यातील तरुणांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
१६ मे रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता राज्यातील शेतकरी आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

सुरक्षारक्षकाचा घाणेरडा प्रकार; चार मुलींना टेरेसवर नेऊन अत्याचाराचा प्रयत्न

■ झुंजार सेनापती l  पिंपरी-चिंचवड पुण्यातील नसरापूर आणि पर्वती परिसरातील धक्कादायक घटनांची चर्चा सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातून पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील...

अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांना १० कॉलेजांचा पसंतीक्रम देण्याची संधी

■ झुंजार सेनापती l  मुंबई राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक माध्यमिक व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!