spot_img
spot_img

राज्यात रस्ता अपघातांतील मृत्युदरात घट परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश

झुंजार सेनापती l मुंबई

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ अखेर राज्यातील रस्ता अपघातांतील मृत्युदरात घट नोंदविण्यात आली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात ३३,००२ रस्ता अपघात झाले असून त्यात १४,०६६ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ मृत्यू झाले होते. अपघातांची संख्या २१८ ने (०.६६ टक्के) वाढली असली तरी मृत्यूंची संख्या ११९ ने (०.८३ टक्के) घटली आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यू ८२ वरून ६१ वर आले असून २६ टक्के घट झाली आहे. अपघातांची संख्या देखील ६६ वरून ५४ इतकी कमी झाली आहे.
नागपूर, पालघर, अमरावती, पुणे, धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अपघाती मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सन २०३० पर्यंत रस्ता अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना मिळणार गती

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या...

बंदर क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार होणार

⬤ झुंजार सेनापती l मुंबई सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!