spot_img
spot_img

“गृहमंत्री झोपलेत का?” नांदेडमध्ये रक्ताचा खेळ; तीन दिवसांत पाच खून,पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी!

झुंजार सेनापती l प्रतिनिधी
नांदेड शहरात सुरू असलेल्या खुनांच्या मालिकेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघ्या तीन दिवसांत पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने नागरिक संतप्त झाले असून “गृहमंत्री झोपलेत का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये वर्चस्वाच्या वादातून भीषण रक्तपात झाला. या तिहेरी हत्याकांडात अर्जितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज यांचा जीव गेला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
त्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्ली येथे रज्जुसिंघ तबेलेवाले याची हत्या करण्यात आली. इतक्यावरच न थांबता आज सकाळी सोनू कल्याणकर या तरुणाचाही खून करण्यात आला. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांचा पोलिसांवर कोणताही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नांदेडमध्ये निर्माण झालेल्या या भयावह परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण असून प्रशासनाविरोधात संताप उसळला आहे. तात्काळ कठोर कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यावे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!