⬤ झुंजार सेनापती l मुंबई
अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची शंका असल्यास आता नागरिकांना थेट प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा, बनावट उत्पादन किंवा आरोग्यास हानीकारक घटक आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क
☎️ टोल-फ्री क्रमांक : १८००२२२३६५
📧 ई-मेल : [email protected]
अन्नपदार्थातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती मिळताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे



