spot_img
spot_img

नागरिकांच्या तक्रारींसाठी एफडीए सज्ज; हेल्पलाईन व ई-मेल जाहीर

झुंजार सेनापती l मुंबई
अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची शंका असल्यास आता नागरिकांना थेट प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा, बनावट उत्पादन किंवा आरोग्यास हानीकारक घटक आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क
☎️ टोल-फ्री क्रमांक : १८००२२२३६५
📧 ई-मेल : [email protected]
अन्नपदार्थातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती मिळताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे

Related Articles

अंजनवती खून प्रकरणाचा नेकनूर पोलिसांनी तीन दिवसांत लावला छडा

⬤ झुंजार सेनापती l बीड तालुक्यातील लिंबागणेश-अंजनवती मार्गावर दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत आढळलेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य अखेर समोर आले आहे. प्रथमदर्शनी अपघात...

दिंडोशी विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल पॉक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

⬤ झुंजार सेनापती l मुंबई अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या पॉक्सो प्रकरणात मुंबईतील दिंडोशी विशेष न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!