spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या महासंग्रामात ११५३ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

झुंजार सेनापती  l पुणे 
पुणे शहराचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार, याचा कौल आज मतदार देणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल १,१५३ उमेदवार मैदानात उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ नगरसेवकांची नसून, पुण्याच्या भविष्यातील विकासदिशा ठरवणारी निर्णायक लढाई ठरली आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार असून प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, प्रश्न असा आहे की मतदारांचा सहभाग किती असणार? गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विकासावर थेट परिणाम करणाऱ्या या निवडणुकीत पुणेकरांनी उदासीनता झटकून मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
राजकीय पक्षांनी प्रचारात मोठमोठी आश्वासने दिली, पण शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण आणि अनियोजित विकास यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उत्तर कितपत दिले, हा खरा मुद्दा आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने अनेक प्रभागांमध्ये मतांचे विभाजन होणार, हेही स्पष्ट आहे.
आजचा निकाल कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने झुकला, तरी नव्या सत्ताधाऱ्यांसमोर जबाबदाऱ्यांचा डोंगर असणार आहे. निवडणूक जिंकणे हा केवळ पहिला टप्पा असून, पुणेकरांच्या विश्वासाला न्याय देणे ही खरी कसोटी असणार आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

शाई पुसून पुन्हा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी...

इराण पेटला! २,५००हून अधिक बळी; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे केंद्राचे आदेश

नवी दिल्ली | पीटीआय इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला सरकारकडून हिंसात्मक मार्गाने दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. आतापर्यंत या आंदोलनात २,५०० हून अधिक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!