झुंजार सेनापती l बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांसमोर बोलताना ते अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. महाराष्ट्रासाठी हा प्रचंड धक्का आहे. एका कर्तृत्ववान आणि जमिनीशी घट्ट नाळ असलेल्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. झालेले नुकसान कधीही भरून निघणारे नाही,” असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. मात्र काही जणांनी या अपघातामागे राजकारण असल्याची भूमिका घेतली आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की यात कोणतेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या दुर्घटनेच्या वेदना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना होत आहेत. कृपया या घटनेला राजकारणाशी जोडू नका,” असे आवाहन शरद पवार यांनी केले.



