spot_img
spot_img

१ मेपासून मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाने रद्द होणार

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची खातरजमा केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरनाईक यांनी सांगितले की, रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषा म्हणजेच मराठीचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांत अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तसेच मराठी बोलण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, ज्या प्रदेशात आपण राहतो त्या ठिकाणची भाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर राज्यांत व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर राखणेही तितकेच आवश्यक आहे.
यामुळे १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Related Articles

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

झुंजार सेनापती | मुंबई बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून...

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेला सुरवात

झुंजार सेनापती | मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करत राज्यात समान नागरी कायद्याचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!