spot_img
spot_img

शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

झुंजार सेनापती l कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.
मोर्चात शेतकरी बैलगाड्या आणि शेती साहित्य घेऊन सहभागी झाले होते. निवडणुकीपूर्वी सरकारने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, दीड ते दोन वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी लागू करावी, अन्यथा पुढील १० ते १५ दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला.

Related Articles

देश संकटात, पण अंधारे बाईंची वाकडे तोंड करून प्रसिद्धी मिळवण्याची धडपड?

⬤ झुंजार सेनापती l मुंबई देशासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संकटांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन जपून वापरण्याचे तसेच काही काळ...

Hellspin kaszinó magyar nyelven: Miért érdemes itt játszani

Az online szerencsejáték világában a Hellspin kaszinó kiemelkedő lehetőségeket kínál a játékosok számára. Ebben a cikkben megvizsgáljuk, miért érdemes a Hellspin kaszinó magyar nyelven...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!