spot_img
spot_img

सिंचन क्षमता वाढीसाठी समन्वयाने काम करा

- मेघना साकोरे-बोर्डीकर

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई, दि. ११ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलसाठा वाढविणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
निर्मल भवन येथील आढावा बैठकीत त्यांनी तलाव, धरणे, कालवे दुरुस्ती, नदी खोलीकरण, चेकडॅम उभारणी आणि पुराचे पाणी साठविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. पूरनियंत्रणाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत तसेच जलयुक्त शिवार आणि ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी पाइपलाइनद्वारे पाणी वितरण, ठिबक सिंचन आणि कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. पाण्याची बचत आणि जलसाठा वाढल्यास शेती उत्पादनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!