⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने महापालिकेने १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जलाशयांमध्ये केवळ २३.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे. अतिरिक्त राखीव साठ्यातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपात लागू करण्यात येत आहे.
समाधानकारक पाऊस पडून जलाशयांतील पाण्याची पातळी वाढेपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.



