spot_img
spot_img

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर संकट ;१५ मेपासून १० टक्के पाणीकपात

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने महापालिकेने १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जलाशयांमध्ये केवळ २३.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे. अतिरिक्त राखीव साठ्यातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपात लागू करण्यात येत आहे.
समाधानकारक पाऊस पडून जलाशयांतील पाण्याची पातळी वाढेपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!