spot_img
spot_img

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर संकट ;१५ मेपासून १० टक्के पाणीकपात

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने महापालिकेने १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जलाशयांमध्ये केवळ २३.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे. अतिरिक्त राखीव साठ्यातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपात लागू करण्यात येत आहे.
समाधानकारक पाऊस पडून जलाशयांतील पाण्याची पातळी वाढेपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!