spot_img
spot_img

१ मेपासून मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाने रद्द होणार

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची खातरजमा केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरनाईक यांनी सांगितले की, रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषा म्हणजेच मराठीचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांत अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तसेच मराठी बोलण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, ज्या प्रदेशात आपण राहतो त्या ठिकाणची भाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर राज्यांत व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर राखणेही तितकेच आवश्यक आहे.
यामुळे १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!