spot_img
spot_img

नागरिकांच्या तक्रारींसाठी एफडीए सज्ज; हेल्पलाईन व ई-मेल जाहीर

झुंजार सेनापती l मुंबई
अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची शंका असल्यास आता नागरिकांना थेट प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा, बनावट उत्पादन किंवा आरोग्यास हानीकारक घटक आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क
☎️ टोल-फ्री क्रमांक : १८००२२२३६५
📧 ई-मेल : [email protected]
अन्नपदार्थातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती मिळताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!