spot_img
spot_img

नागरिकांच्या तक्रारींसाठी एफडीए सज्ज; हेल्पलाईन व ई-मेल जाहीर

झुंजार सेनापती l मुंबई
अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची शंका असल्यास आता नागरिकांना थेट प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा, बनावट उत्पादन किंवा आरोग्यास हानीकारक घटक आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क
☎️ टोल-फ्री क्रमांक : १८००२२२३६५
📧 ई-मेल : [email protected]
अन्नपदार्थातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती मिळताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे

Related Articles

“कार्यालयाला कुलूप, कर्मचारी बेपत्ता! बीड पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर”

⬤ झुंजार सेनापती l मुंबई शासकीय कार्यालयांमधील अनागोंदी कारभार आणि जनतेच्या कामांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली आहे. दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांनी...

भविष्यात मुलांना झाडे दाखवण्यासाठी विशेष ठिकाणी न्यावे लागेल!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई यंदाचा उन्हाळा अत्यंत भीषण ठरला असून आगामी पावसाळा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे पुढील वर्षी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!